मुख्यमंत्री वृक्षारोपण प्रोत्साहन योजना

🌳 मुख्यमंत्री वृक्षारोपण प्रोत्साहन योजना 🌳

अमलबजावणी करणारे विभाग: पर्यावरण व हवामान बदल विभाग, महाराष्ट्र शासन

उद्दिष्ट:
राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हरित क्षेत्र वाढविणे व पर्यावरण संवर्धन साध्य करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिक, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO) आणि गट सहभागातून “हरित महाराष्ट्र” निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये:

  • नागरिक, संस्था, स्वयंसहायता गट इत्यादींना वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन.

  • लागवड व संगोपन यशस्वीरीत्या केल्यास आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.

  • लावलेली झाडे ठरावीक कालावधीपर्यंत (साधारणतः ३ वर्षे) जिवंत ठेवणे बंधनकारक.

  • पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त.

फायदे:

  • जास्त प्रमाणात झाडे टिकवून ठेवणाऱ्या व्यक्ती व संस्थांना आर्थिक बक्षीस.

  • हरित आणि स्वच्छ महाराष्ट्रासाठी सर्वसामान्यांचा सहभाग.

  • शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना.

मुख्य उद्दिष्ट:
महाराष्ट्रात “हरित क्रांती” घडवून आणणे आणि राज्याचे वनक्षेत्र वाढविणे. मुख्यमंत्री वृक्षारोपण प्रोत्साहन योजना.

Leave a Comment